'जो निर्णय अशोक चव्हाण घेतील तीच पूर्वदिशा असणार' माजी खा.भास्करराव खतगावकर यांची भूमिका !

TEAM BRIEFNEWSBOOK
By -



नांदेड - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसची (Congress) साथ सोडली आणि भाजपमध्ये जाण्याचा विचार केला आहे. यामुळे काँग्रेस पक्षामध्ये अशोक चव्हाण यांना मानणारी अनेक नेते मंडळीही भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे चव्हाण यांचे सख्खे दाजी तसेच नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर (Bhaskarrao Patil Khatgaonkar) हे आता काय भूमिका घेणार असा प्रश्न विचारला जात असताच, त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपली काय भूमिका असणार? त्यावर बोलताना भास्करराव खतगावकर म्हटले की, 'अशोक चव्हाण म्हणतील तो निर्णय आणि तीच पूर्वदिशा असणार, असं खतगावकर म्हणाले आहे. यामुळे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशा नंतर त्यांचे दाजी भास्करराव खतगावकर हे सुद्धा लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट होतं आहे.


भाजपात जाण्याअगोदर चव्हाण यांनी केली होती चर्चा

मात्र, अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर बोलत असताना भास्करराव खतगावकर म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी जो पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला आहे, तो योग्यच आहे. भाजपमध्ये जाण्याच्या त्यांच्या निर्णयापूर्वी या विषयावर आमच्यामध्ये चर्चा सुद्धा झाली होती. मराठवाड्यातील विकासाचे प्रश्न सोडवायचे असतील तर यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे अस माझं स्पष्ट मत मी त्यावेळी व्यक्त केलं होत. मागील दहा वर्षात विदर्भामध्ये नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार असतील ज्या वेगाने ते त्यांच्या विभागातील प्रश्न सोडवत आहे, त्या गतीने मराठवाड्यातील प्रश्न सुटत नाही. यामुळे अशोक चव्हाण यांना भाजपात जाण्याच्या निर्णय घ्यावा असं मी म्हणालो होतो, अस भास्करराव खतगावकर म्हणाले आहे.


मराठवाड्याच्या विकासासाठी भाजपात प्रवेश महत्त्वाचा

पुढे बोलताना ते म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्या सोबत तीन दिवसांपूर्वी सुद्धा चर्चा झाली आहे. त्यावेळीही त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर असून, काय निर्णय घेऊ असं विचारल होत. त्यावेळी देखील मी त्यांना मराठवाड्याच्या विकासासाठी भाजपमध्ये जायला पाहिजे असं सांगितल होत. त्यावर आमची खूप चर्चाही झाली. अशोक चव्हाण हे दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहे. सतत सत्तेत असताना ते मंत्री सुद्धा होते. यामुळे आता त्यांचे वैयक्तिक काही स्वार्थ नाही. परंतु, आज आम्हाला नांदेड जिल्ह्यासोबत मराठवाड्याच्या विकासाचे अनेक प्रश्न सोडवायचे आहे, असं खतगावकर म्हणाले आहे.