थंडीत फ्लू आणि सर्दी का होते? त्याची कारणे काय? ते होऊ नये यासाठी काय करावे पहा तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

TEAM BRIEFNEWSBOOK
By -



देशभरात चांगलीच गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा गुलाबी थंडी तुम्हाला हवीहवीशी वाटत असली तरी देखील ती बऱ्याच आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते का ? हिवाळा या ऋतूत विविध आजार डोकेवर काढतात. हिवाळ्यात आरोग्याच्या (Health) छोट्या - मोठ्या तक्रारी उद्धभवतात. हिवाळ्यात विशेषतः सामान्य सर्दी, फ्लू (Flu) यांसारखे संसर्गजन्य परिस्थितीत वाढ झाल्याचे दिसून येते. फ्लूचा प्रादुर्भाव साधारण वर्षभर दिसून येतो, कारण अशावेळी फ्लूचे विषाणू हिवाळ्यामध्ये सर्वाधिक वाढलेले दिसून येतात.

हिवाळ्यामध्ये फ्लू किंवा इतर संसर्ग वेगाने पसरतात. सामान्य सर्दीपेक्षा कधीही होणारी सर्दी फ्लूचा प्रादुर्भाव साधारणपणे शरद ऋतू आणि हिवाळ्यामध्ये दिसून येतो. अशा परिस्थितीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी चांगली प्रतिकारशक्ती असणे गरजेचे आहे. मात्र आपल्या सर्वांना हिवाळ्याच्या दिवसात फ्लू आणि सर्दी का? होते. तुम्हाला माहीत आहे का, याच विषयावर द इंडियन एक्स्प्रेसने माहिती दिली असल्याचे वृत्त आहे. ती माहिती आता आपण समजून घेऊ.


थंडीच्या दिवसांत शरीराच्या अंतर्गत अवयवांचे तापमान राखण्यासाठी अनेक गोष्टी बदलतात. जर शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्तभिसरण स्थिर असेल तर थंडीची भावना सामान्य असते. मात्र काही लोकांना अधिकच थंडी जाणवते याचे कारण असे की, शरीर आपले तापमान स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते. सर्दी सुरुवातीला नाकाला जाणवते. हिवाळा सुरू होताच काही लोकांना सर्दी सुरू होते. विशेष म्हणजे जेव्हा त्यांना बाहेर पडावे लागते. घरामधून बाहेर पडताच सगळी सर्दी नाकातोंडात जाते.


आता प्रथमच हार्वर्ड मेडीकल स्कुलच्या अभ्यासाने आपल्या शरीराची स्थिती आणि सामान्य प्रतिकारशक्तीची पातळी विचारात न घेता, हिवाळ्यात आपल्याला सर्दी आणि फ्लू का होते याचे अचूक उत्तर दिले आहे. अभ्यासाचे प्रमुख, लेखक सहयोगी प्राध्यापक डॉ.बेंजामिन ब्लेअर यांनी सांगितले. आपल्या नाकात इन्फेक्शन आणि अँलर्जी पसरवणाऱ्या घटकांपासून बनवण्यासाठी एक आवरण असतं. बाहेरच तापमान कमी असल्याने नाकामधील तापमान देखील ४ डिग्रीने कमी होते. त्या आवरणामध्ये विषाणू आणि अँलर्जी पसरवणारे घटक अडकून राहतात. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.


हिवाळ्यामध्ये आपली इम्युनिटी कमी होते. त्यामुळे जिवाणूंचा सहजपणे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हार्वर्ड मेडिकल स्कुलमध्ये केलेल्या अभ्यासानुसार थंड हवामानात प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे विषाणू नाकाच्या पेशींना चिटकून राहतात आणि त्यामुळेच संसर्ग होतो.


थंडीच्या दिवसात वातावरणात उडणारे परागकण नाकावाटे शरीरामध्ये जाऊन अँलर्जी होण्याची शक्यता असते. अँलर्जीमुळे देखील अंगदुखी, सर्दी, खोकला आणि ताप येण्याची शक्यता असते. ऋतू बदलताना तापमानात होत असलेल्या चढ - उतारामुळे विषाणूवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते आणि त्यामुळे साहजिकच संसर्गाची दाट शक्यता वाढते. पण हिवाळा स्थिरावल्यावर जो सर्दी, खोकला होतो त्यासाठी विषाणूसंसर्ग हे कारण सहसा नसते. हिवाळ्यामध्ये हवा थंड झाल्याने जमिनीलगतच्या हवेच्या थरात अनेक धूलिकण, परागकण अडकून बसतात. वैज्ञानिक परिभाषेत त्याला धुके म्हणतात. ते धूर आणि धुके याचे मिश्रण असते. अशा हवेमध्ये धुळीची घनता वाढलेली असते. या धुलिकणांच्या प्रदूषक घटकांच्या अँलर्जीमुळे त्या काळात सर्दी होते.


हिवाळ्यामध्ये फिट आणि निरोगी राहण्यासाठी आहारापासून ते व्यायामपर्यंत सर्व दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी. त्यासाठी तुम्हाला फळे आणि भाज्यांचा आहारामध्ये समावेश करायला हवा. तज्ज्ञांच्या मते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-बी ६, व्हिटॅमिन-सी,व्हिटॅमिन-ई आणि झिंकची गरज असते. झिंक सर्दी आणि फ्लूच्या लक्षणांपासून आराम देते.